शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

साखरेचे दर घसरू लागल्याने ऊसदराची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 01:07 IST

कोल्हापूर : साखर कारखान्यांचा हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू होण्याआधीच साखरेच्या दरात घसरण सुरू झाल्याने जाहीर केलेली उचल कशी द्यायची? मूळ एफआरपी देतानाही दमछाक होणार आहे. यासाठी शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी सरकारच्या पातळीवर आवाज उठवावा, असे आवाहन जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केले.गळीत हंगाम सुरू होऊन आठ-दहा ...

कोल्हापूर : साखर कारखान्यांचा हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू होण्याआधीच साखरेच्या दरात घसरण सुरू झाल्याने जाहीर केलेली उचल कशी द्यायची? मूळ एफआरपी देतानाही दमछाक होणार आहे. यासाठी शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी सरकारच्या पातळीवर आवाज उठवावा, असे आवाहन जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केले.गळीत हंगाम सुरू होऊन आठ-दहा दिवस झाले नाहीत तोपर्यंत प्रतिक्विंटल ३४५० रुपयांपर्यंत साखरेचे दर खाली आले आहेत. हंगाम संपल्यानंतर काय होईल, ही बाब कारखान्यांच्या दृष्टीने चिंताजनक आहे. साखरेचे दर वाढू लागले की केंद्रीय वाणिज्य मंत्री रामविलास पासवान ट्विट करायचे, ‘कारखाने व व्यापाºयांना स्टॉक मर्यादा घातली.’ पण आता ते गप्प का? असा सवाल करीत गेल्या वर्षीपेक्षा प्रतिटन ३०० रुपये ‘एफआरपी’मध्ये वाढ झाल्याने सरासरी तीन हजार रुपये एफआरपी झाली आहे.उसाच्या पहिल्या उचलीबाबत निर्णय घेताना ३५०० रुपये साखरेचा दर गृहीत धरला होता. साखरेचे दर ३४०० रुपयांच्या खाली येऊ नयेत, यासाठी शेतकरी संघटनांचे नेते खासदार राजू शेट्टी, कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत व रघुनाथदादा पाटील यांनी प्रयत्न केले पाहिजेत.सध्या राज्य बॅँकेने साखरेचे ३५०० रुपये मूल्यांकन केले असून त्यातील प्रक्रिया खर्च प्रतिटन २५० रुपये, अल्पमुदत कर्ज, नजरगहाण कर्ज, सहवीज / एम. टी. / मशिनरी आधुनिकीकरण कर्ज, पॅकेज पुनर्बांधणी कर्जहप्ता, थकीत व्याज यांसाठी प्रतिटन ५०० रुपये राखून ठेवावे लागणार आहेत. त्यामुळे केवळ उसासाठी २२७५ रुपये उपलब्ध होणार आहेत. पुढील पंधरवड्याच्या साखरेवर मागील पंधरवड्यातील उसाचे पैसे भागवायचे म्हटले तरी अडचण येणार आहे.साखर मूल्यांकन व शॉर्ट मार्जिनसाखर मूल्यांकन बॅँकांकडून उसाची पहिली कमी पडणारीमिळणारी रक्कम उचल रक्कम३५०० रुपये २२२५ रुपये ३००० रु. ७७५ रुपये३४५० रुपये २१८२ रुपये ३००० ८१८ रुपये३४०० रुपये २१४० रुपये ३००० ८६० रुपये३३०० रुपये २०५५ रुपये ३००० ९४५ रुपयेयासाठीच तीन टप्प्यांत दर हवापक्क्या मालाचा दर निश्चित नसताना, तो वर्षभर गोदामामध्ये पडून राहत असताना कच्च्या मालाचा दर ठरविणारा साखर उद्योग हा एकमेव आहे. त्यामुळे कारखाने अडचणीत येणार आहेत. यासाठी उसाचा दर तीन टप्प्यांत देणे गरजेचे असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.शेट्टींवर विश्वास !देशातील शेतकरी संघटनांचा दोन दिवसांत दिल्लीत मोर्चा आहे. तिथे राजू शेट्टी साखरेच्या घसरलेल्या दराचा मुद्दा मांडतील, याचा मला विश्वास असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेती