शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
4
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
5
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
6
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
7
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
8
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
9
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
10
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
11
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
12
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
13
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
14
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
15
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
16
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
17
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
18
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
19
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
20
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू

साखरेचे दर घसरू लागल्याने ऊसदराची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 01:07 IST

कोल्हापूर : साखर कारखान्यांचा हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू होण्याआधीच साखरेच्या दरात घसरण सुरू झाल्याने जाहीर केलेली उचल कशी द्यायची? मूळ एफआरपी देतानाही दमछाक होणार आहे. यासाठी शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी सरकारच्या पातळीवर आवाज उठवावा, असे आवाहन जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केले.गळीत हंगाम सुरू होऊन आठ-दहा ...

कोल्हापूर : साखर कारखान्यांचा हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू होण्याआधीच साखरेच्या दरात घसरण सुरू झाल्याने जाहीर केलेली उचल कशी द्यायची? मूळ एफआरपी देतानाही दमछाक होणार आहे. यासाठी शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी सरकारच्या पातळीवर आवाज उठवावा, असे आवाहन जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केले.गळीत हंगाम सुरू होऊन आठ-दहा दिवस झाले नाहीत तोपर्यंत प्रतिक्विंटल ३४५० रुपयांपर्यंत साखरेचे दर खाली आले आहेत. हंगाम संपल्यानंतर काय होईल, ही बाब कारखान्यांच्या दृष्टीने चिंताजनक आहे. साखरेचे दर वाढू लागले की केंद्रीय वाणिज्य मंत्री रामविलास पासवान ट्विट करायचे, ‘कारखाने व व्यापाºयांना स्टॉक मर्यादा घातली.’ पण आता ते गप्प का? असा सवाल करीत गेल्या वर्षीपेक्षा प्रतिटन ३०० रुपये ‘एफआरपी’मध्ये वाढ झाल्याने सरासरी तीन हजार रुपये एफआरपी झाली आहे.उसाच्या पहिल्या उचलीबाबत निर्णय घेताना ३५०० रुपये साखरेचा दर गृहीत धरला होता. साखरेचे दर ३४०० रुपयांच्या खाली येऊ नयेत, यासाठी शेतकरी संघटनांचे नेते खासदार राजू शेट्टी, कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत व रघुनाथदादा पाटील यांनी प्रयत्न केले पाहिजेत.सध्या राज्य बॅँकेने साखरेचे ३५०० रुपये मूल्यांकन केले असून त्यातील प्रक्रिया खर्च प्रतिटन २५० रुपये, अल्पमुदत कर्ज, नजरगहाण कर्ज, सहवीज / एम. टी. / मशिनरी आधुनिकीकरण कर्ज, पॅकेज पुनर्बांधणी कर्जहप्ता, थकीत व्याज यांसाठी प्रतिटन ५०० रुपये राखून ठेवावे लागणार आहेत. त्यामुळे केवळ उसासाठी २२७५ रुपये उपलब्ध होणार आहेत. पुढील पंधरवड्याच्या साखरेवर मागील पंधरवड्यातील उसाचे पैसे भागवायचे म्हटले तरी अडचण येणार आहे.साखर मूल्यांकन व शॉर्ट मार्जिनसाखर मूल्यांकन बॅँकांकडून उसाची पहिली कमी पडणारीमिळणारी रक्कम उचल रक्कम३५०० रुपये २२२५ रुपये ३००० रु. ७७५ रुपये३४५० रुपये २१८२ रुपये ३००० ८१८ रुपये३४०० रुपये २१४० रुपये ३००० ८६० रुपये३३०० रुपये २०५५ रुपये ३००० ९४५ रुपयेयासाठीच तीन टप्प्यांत दर हवापक्क्या मालाचा दर निश्चित नसताना, तो वर्षभर गोदामामध्ये पडून राहत असताना कच्च्या मालाचा दर ठरविणारा साखर उद्योग हा एकमेव आहे. त्यामुळे कारखाने अडचणीत येणार आहेत. यासाठी उसाचा दर तीन टप्प्यांत देणे गरजेचे असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.शेट्टींवर विश्वास !देशातील शेतकरी संघटनांचा दोन दिवसांत दिल्लीत मोर्चा आहे. तिथे राजू शेट्टी साखरेच्या घसरलेल्या दराचा मुद्दा मांडतील, याचा मला विश्वास असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेती